Total Pageviews

Saturday, July 23, 2016

जय भवानी!जय शिवाजी!

कौटिल्याच्या कल्पनेत राज्य हे पोलीस स्टेट नाही. वेल्फेअर स्टेट आहे. त्यामुळे व्यापारवृद्धी, शेतीला मदत, दुष्काळी सोय इत्यादीला कौटिल्य महत्व देतो. शिवरायसुद्धा कारभाराचा चोखपणा व जनहिताची कामे यांना महत्व देतात. इसविसनपूर्व ३०० ते इसविसनपूर्व १६०० या १९०० वर्षात शेकडो हिंदू राजे आले, एकही कौटिल्याने कल्पिलेल्या राजासारखा वागला नाही. शिवाजी मात्र कौटिल्याच्या नमुन्याप्रमाणे आहेत. जणू कौटिल्याने कल्पिलेला राजा १९०० वर्षांनी साकार झाला. - नरहर कुरुंदकर.

No comments:

Post a Comment